10 July, 2009

क्रांतीसुर्य सावरकर

दमनकारी ब्रिटीश सत्ताधीशांची दडपशाही आणि अत्याचार आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या उद्देशाने, ब्रिस्टनच्या तुरुंगातून मुंबईला नेत असताना सुटका करुन घ्यायची योजना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आखली होती. त्या योजनेबरहुकूम ८ जुलै १९१० रोजी मार्सेल्सच्या समुद्रात सावरकरांनी जी ऎतिहासिक साहसीउडी मारली त्याला आता ९९ वर्षे पुर्ण झाली. पुढे ३० जानेवारी १९११ रोजी सावरकरांना दोन जन्मठेपेच्या काळ्यापाण्याची शिक्षा झाली. पुढचं वर्ष हे स्वातंत्र्यवीरांना झालेल्या शिक्षेचं शताब्दी वर्ष आहे. वीर सावरकरांचं संपुर्ण आयुष्यच ओजस्वी घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. अनेक प्रसंग, जे आठवले की अंगावर रोमांच उभं रहातं. काय होईल याची पुर्ण जाणीव असतानाही जिवाची बाजी लावून मातृभुमीसाठी आयुष्याचा यज्ञ या क्रांतीसुर्याने पेटवला. त्या यज्ञातील काही समीधारुपी प्रसंग आपण जाणून घेऊया या शताब्दी वर्षाच्या निमीत्ताने क्रांतीसुर्य सावरकर या मालेत.

(क्रमशः)

नरेन्द्र प्रभू

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates