28 July, 2009

कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने

थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावरकरांचा पण १९१० च्या मार्च मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी सावरकराना ब्रिटीश सरकारने पकडले, गुन्हा होता ‘ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रचळवळ ’. देहांताची शिक्षा होऊशकेल असा हा गुन्हा. अअता या जन्मात पुन्हा भेट घडणे असंभवनीय. आपल्या प्रिय वहिनीला हे वृत्त कळवताना, त्या मागील दिव्य आणि उदात्त हेतू स्पष्ट करताना इंग्लंडच्या ब्रिस्टन जेलमधून बहूदा आयुष्यातले शेवटचे होऊपाहणारे पत्र लिहीले. जणू मृत्यूपत्रच होते ते. अशा कठीण प्रसंगीही स्वातंत्रवीर सावरकरांची प्रतिभा, तेजस्वी विचार, जाज्वल्य देशप्रेम कसं उफाळून आली होतं पहा. वीर सावरकर म्हणतात.

हे मातृभूमि, तुजला मन वाहिलेलें ॥

वक्तृत्व-वाग्विभवही तुज अर्पियेलें ॥

तूंतेचि अर्पिलि नवी कविता रसाला ॥

लेखांप्रती विषय तूंचि अनन्य झाला ॥१६॥


त्वत्स्थंडिली ढललिले प्रिय मित्रसंघा ॥

केलें स्वयें दहन यौवन-देह भोगा ॥

त्वत्कार्य नैतिक, सुसंमत सर्व देवा ॥

त्वत्सवेनींच गमलीं रघुवीर सेवा ॥१७॥


त्वत्स्थंडिली ढललिली गृह-वित्-मत्ता ॥

दावानलांत वहिनी, नवपुत्र, कांता ॥

त्वत्स्थंडिली अतुल-धैर्यवरिष्ठ बंधू ॥

केला हवी परम कारूण पुण्यसिंधू ॥१८॥


त्वत्स्थंडिलाचरी बळी प्रिय बाळ माझा ॥

त्वत्स्थंडिली बघ अतां मामा देह ठेला ॥

हें काय ! बंधु असतो जरि सात आम्ही ॥

त्वत्स्थंडिलींच असते दिधले बळी मी ॥१९॥


कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने ॥

लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-मानें ॥

जें दिव्य दाहक म्हणूनी असावयाचें ॥

बुध्द्याचि वाण धरिले करिं हें सतीचें ॥२५॥


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates