11 October, 2014

सत्याचा अर्थ नोबेल


भारताचे कैलाश सर्त्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफजाई  यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्या महान व्यक्तींचं अभिनंदन. दोघांचही वैशिष्ट्य म्हणजे तरूण वयातच त्यांनी लहान मुलांसाठी स्वत:ला वाहून घेतलं आणि आपलं काम निष्ठेने करीत राहिले. कैलाश सर्त्यार्थी आज साठ वर्षाचे आहेत पण वयाच्या तीसाव्या वर्षीच अभियंता असलेल्या कैलाशनी भरभक्कम पगाराची नोकरी सोडून बाल मजूरी विरुद्ध आवाज उठवला.
मलाला युसूफजाईचं तर आणखीनच कौतूक करायला हवं कारण आज ती सतरा वर्षांची आहे आणि वयाच्या अकराव्या वर्षीच तीने मुलींच्या शिक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली.  पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या धमक्यांपायी मुलींना शिकू दिले जात नाही व समाजात एकूणच त्यांची अवस्था दयनीय असते. याविरोधात तिने आवाज बुलंद केला होता. त्यामुळे चिडून जाऊन तालिबानी अतिरेक्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्लाही चढवला होता. तिच्या डोक्याला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली होती, परंतु मोठय़ा जिद्दीने मृत्यूशी दोन हात करीत तिने ही लढाई जिंकली होती. त्यानंतरही तिने आपले काम सुरूच ठेवले आहे.  पाकिस्तानात आणि अफगाणीस्तानच्या सिमेवरच्या स्वात खोर्‍यात अतिरेक्यांचा वावर ही रोजचीच गोष्ट आहे त्याच अतिरेक्यांनी तिच्यावर गोळ्या चालवल्या आणि ती मृत्यूच्या दारातून परत आली.

कैलाश सर्त्यार्थी आणि मलाला युसूफजाई यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणजे मनवतेलाच तो मिळाला आहे. या आनंदात आपणही सहभागी होवूया.




        

2 comments:

  1. दोघांचही अभिनंदन.
    छान माहिती दिलीत..............

    ReplyDelete
  2. ' सत्याचा अर्थ नोबेल ' हे शिर्षक खूप सार्थ.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates