14 November, 2016

मधुमेहाचा (Diabetes) रोगी बरा होतो?


आज जागतिक मधुमेह दिन. हा काय साजरा करण्यासारखा दिवस नाही, तर या रोगा विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी याचे आयोजन असावे. गेली दहा वर्ष मला मधुमेहाने ग्रासलेलं असून त्यावर उपाय म्हणून घेतलेली ऍलोपथीची औषधं मुंबईतले निक्ष्णात समजले जाणारे डॉक्टर नेहमीच वाढवून देत आले आहेत. रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ही औषधं घेत रहायचं. मात्र त्या रोगावर उपाय केला जात नाही. म्हणजे असं की ही राखर का वाढते ते पाहिलं जात नाही, तर वाढलेली साखर तात्पूर्ती नियंत्रणात राहाण्यासाठी औषधं देणं एवढचं काम हे डॉक्टर करतात आणि ती दिवसोंदिवस वाढतच जातात. (एवढी की यावर उपाय करणार्‍या एका डॉक्टरची स्वत:ची औषधं कंपनी आहे.)

मधुमेह निसर्गोपचारांनी बरा होतो किंवा त्यावर आयुर्वेदिक औषधं घेतल्याने नियंत्रण मिळवता येते असं समजल्याने मी  सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्राच्या  आरोग्य धाममध्ये हेच उपचार करून घेण्यासाठी नुकताच गेलो होतो. तीन दिवस  आरोग्यधाममध्ये उपचार करून घेतले. मधुमेह आणि त्यामुळे गॅग्रीन झालेला पाय कापून टाकण्याचा सल्ला ऍलोपथीच्या डॉक्टॅरांनी दिला असताना एक रुग्ण (जे माझे दूरचे नातेवाईक आहेत) या निसर्गोपचार केंद्रात गेल्यावर्षी दाखल झाले होते, त्यानी उपचार करून घेतले आणि ते साधारण अडीज महिन्यात गॅग्रीन झालेला पायाची जखम  पुर्ण बरी झाल्यावर आपल्या पायावर घरी चालत गेले. अशा उदाहरणांमुळे मला माझ्या  तब्यती विषयी सकारात्मक भाव निर्माण झाले. डॉ. रसिका करंबेळकर यांनी केलेले उपचार खासच होते. तेथील योग शिक्षक श्री. विद्याधर करंबेळकर शिकवलेला योग आणि प्राणायाम हे सर्व या आधीसुद्धा शिकलो होतो पण योग्य तंत्र इथे शिकवलं गेलं. दि. ३०/१०/२०१६ पासून कसलीच मधुमेहाची औषधं न घेता शरीरातील साखर नियंत्रणात आहे. त्याचा आकडेवारी पुढील प्रमाणे
दिनांक.             Fasting        P. P
18/10/2016        137.5      192.7
30/10/2016        111        229
01/11/2016        143        139
06/11/2016         97        137
11/11/2016         86.4       93.6

दि. ३०/१०/२०१६ पासून मात्र २१ दिवसांच पथ्य डॉक्टरनी सांगितलं आहे. ३० तारीखला विरेचन खरं तर शुद्धीक्रिया केल्यावर खुप फरक पडत गेला.

लोकांना वीरेचन ऐकून माहिती आहे  म्हणून विरेचन असं लिहिलं.  पण सिंधुदुर्ग योग निसर्गोपचार केंद्रात होते ती शुद्धीक्रीया. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर गाडीवर तुसतं पाणी मारणे व संपूर्ण सर्व्हिसींग करणे यातील फरक आरोग्यधाम मध्ये संपूर्ण सर्व्हिसींग करून विरेचनासकट अन्य फायदे घेता येतात. यात दोन्ही आतड्यांची धुलाई होता होता प्लीहा, यकृत, स्वादुपींड, liver spleen pancreas यांची शुद्धीक्रीया होते. तसेच स्वादुपींड अधिक सक्षम बनून इन्सुलिन निर्माण करण्यासाठी सक्षम बनते HDL वाढून LDL कमी होतेtriglycerides normal होते. कफ एलर्जी जुनाट सर्दी दूषीत वात पित्त कफ समान होऊन ह्रुदय कमीतकमी सहामहिन्यासाठी सुरक्षित रहाते. बद्धकोष्ठ अपचन मुळव्याध पित्ताचे खडे यात लाक्षणिक पण दूरगामी चांगला लाभ होतो.एवढे सगळे लाभ शुद्धीक्रीया केल्या होतात. आपण याला BODY SERVICING किंवा शरीर शुद्धीक्रीया म्हटल्यास ही व्याख्या अधिक व्यापक होईल


  डॉ. रसिका करंबेळकर यांनी सुचवलेले उपाय करून मधुमेहापासून सुटका करून घेण्याचा मानस आहे. मधुमेहाचा (Diabetes) रोगी बरा होतो का? असा प्रश्न विचारल्यास ‘नाही’ असं उत्तर ऍलोपथीचे डॉक्टर देतात. मात्र डॉ. रसिका करंबेळकर यांनी तुमच्या ऍलोपथीच्या गोळ्या बंद होतीलच असा विश्वास दिलाय. पुढच्या जागतिक मधुमेह दिनापर्यंत मी याचा मागोवा घेत राहीन आणि तो या ब्लॉगवर  प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करीन. पाहूया .....!   
  

   

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates