29 May, 2017

मेजर लितुल गोगईंना पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत करण्यात यावे




पद्म पुरस्काराची उंची वाढवायची असेल तर मेजर लितुल गोगईंसारख्या खमक्या अधिकार्‍याला पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत केलं पाहिजे. काश्मिरमध्ये चाललेल्या देशद्रोही कारवाया आणि देशातील त्यांच्या पाठिराख्या नादान, नालायक घृणेसपात्र असलेल्या व्यक्तिंना त्यांची जागा दाखवायची असेल आणि योग्य संदेश द्यावयाचा असेल तर हे करणे अतिशय आवश्यक आहे. मुळात सैनिक हा हकनाक जीव देण्यासाठी नसतोच आणि या मेजरने तर कर्तव्य बजावणार्‍या निवडणूक अधिकार्‍यांना मृत्यूच्या दाढेतून मोठ्या हिमतीने परत आणलं. स्वत: मृत्यूला सामोरं जात, आपल्या सहकार्‍यांचा जीव वाचवला आणि एक प्रकारे मृत्यूवर विजय मिळवला. मुळात युद्धभूमीवरच्या असामान्य परिस्थितीला तोंड देण्याचंच ज्याना प्रशिक्षण मिळतं त्याना निवडणूकीच्या कामात जुंपलं जातं आणि तिथे युद्धजन्य परिस्थिती ओढवल्यावर त्यांनी तलवार म्यान करावी अशी अपेक्षा बाळगली जाते हे जगात आपल्याच देशात घडू शकतं. काश्मिरमध्ये सातत्याने सुरक्षा करणार्‍या जवानांवर हल्ले होतात आणि आपण फक्त हळहळत बसतो हे किती दिवस चालायचं?              

लष्करप्रमूख जनरल बिपीन रावत यांनी ‘जवानांना वार्‍यावर सोडू शकत नाही’ असं म्हटलं आहे ते या पार्श्वभूमीवर खुप महत्वाचं आहे. सैनिक, अर्धसैनिक आणि पोलिसांवर हात उगारणार्‍य़ांचे हात तत्काळ कलम केले गेले पाहिजेत. पण हे केव्हा घडेल तर त्यांच्या छुप्या पाठीराख्यांचा आणि घरभेद्यांचा बंदोवस्त होईल तेव्हाच ना? नक्षलप्रभावित राज्यांच्या प्रमुखांची केंद्रीय गृहमंत्रांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीत आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी हीच बाब निदर्शनास आणून दिली. शेवटी खलप्रवृत्तीला शासनाचा धाक हा असावाच लागतो. आपण शिवाजी महाराज्यांचा वारसा सांगतो, त्यानी स्वराज्यात हा भोंगळपणा सहन केला असता काय? अरुंधती राय, बरखा दत्त या सारख्यांची जिभ सडणार नाही तर ती हासडावी लागेल. भारतात बसून पाकिस्तानला गोंजारत विषवल्लीची वाढ करणार्‍या या नराधमांच्या फळीचा आधी बंदोवस्त केला गेला पाहिजे. सेक्युल्यारीझम, आझादी, स्वातंत्र्य असल्या शब्दांचा आधार घेत, त्या मागे लपत सुकमासारख्या अंतर्गत भागात आणि तिकडे सिमेवर शत्रूला थेट मदत करण्यापर्यंत मजल मारणार्‍या बोरूबहाद्दर आणि अतिरेक़ी यांच्यात आता फरक करण्याची आवशयकता नाही.  
           
भारतीय सैन्य दलाने मंगळवारी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि असंख्य बंकर उद्ध्वस्त केले आणि पाक सैन्याने केलेल्या गोळीबाराला तोफ गोळ्यांनी उत्तर देऊ, असे दाखवून दिले. आता देशांतर्गत शत्रूंचा निप्पात करायची वळ येऊन ठेपली आहे.  सारा देश भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल अभिमान प्रकट करीत असताना काश्मीरमधील काही संघटना आणि काही राजकीय पक्ष व त्यांचे अवसान घातकी नेते मेजर लितुल गोगईच्या सन्मानावरून राजकारण करण्यात मग्न झाले आहेत.

मेजर लितुल गोगईंनी केलेली कृती ही देशात आणि देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालून देशरक्षणासाठी झटणार्‍या जवानांना स्पूर्ती दायक अशीच आहे. शिवाय आपल्यासरख्या देशवासीयांना दिलासा देणारी अशी आहे. बुर्‍हाण वाणी या दहशत वाद्याचा खातमा केल्यापासून सुरक्षादलाला रोजच्यारोज लक्ष केलं जात आहे.

नऊ एप्रिल रोजी श्रीनगर लोकसभा मतदार संघात मतदान सुरू होतं त्या दिवशी काश्मीरमध्ये कमालीच्या तणावात हे मतदान चाललं असताना बडगाममधील एका मतदान केंद्रावर काश्मिरी तरूणांनी दगडफेक करून निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचे प्रयत्न केले. दगडफेक व हिंसाचार चालू असताना मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या सतरा कर्मचार्यांचे जीव धोक्यात आले होते. या सतरा जणांचे प्राण वाचले ते मेजर गोगई यांच्या कामगिरीनेच. त्यांनी दगडफेक करणार्‍य़ा तरूणांना चिथावणी देणार्‍य़ा फारूख दारला पकडले व त्याला बांधून जीपच्या बोनेटवर बसवले. ती जीप त्याच्या सह सुरक्षीत ठिकाणी आणण्यात आली . हिंसक जमावाला पांगवण्यासाठी मेजर गोगईंनी केलेली ही कृती यशस्वी ठरली. गोळीबाराच्या फैरी न झाडता किंवा रक्तपात न होता मेजर गोगई यांनी अपेक्षीत परीणाम साधला. मग मानवी हक्कांच्या मूल्यांचे उल्लंघन केले म्हणून ‘आजादी’ टोळीने टाहो फोडायला सुरूवात केली, पण तसे करून सतरा कर्मचार्यांचे प्राण वाचवले, त्याविषयी कोणीच बोलत नाही.

मेजर गोगई यांना लष्कर प्रमुखांनी दिलेला पुरस्कार हा काश्मिरी तरूणाला जीपवर बांधून फिरवल्याबद्दल नव्हे तर सतरा कर्मचार्‍यांचे प्राण वाचवले यासाठी आहे. मेजर लितुल गोगईंच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना   पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत करण्यात यावे. संपूर्ण देशाची ही मागणी असली पाहिजे, जनतेने आधिच त्यांना  धन्यवाद देऊन पुरस्कार प्रदान केला आहे.   


  

28 May, 2017

यांदा स्वर्गत जावक नाय!



आये  : अरे मेल्या पाकरांका कित्या गुंडे मारत ?

बाबलो : तर....., रातभर निज नाय आणि सकाळच्याक जरा निजतलय तर हेना नुसतो जिव खाल्ल्यान.  नुसता          कुहू...... कुहू...... कुहू...... काय चल्ला.... काय?

आये  : आरडाने होती बाबडी, तुज्या कित्या पोटात चावता?      

बाबलो : ही बाबडी कोण?    

आये  : मेल्या तुच आता म्हणा होत मा? नुसता कुहू...... कुहू...... कुहू...... काय चल्ला....  म्हणान. ती कोण कोकीळा आराडता हा.    

बाबलो : (चमकान) अगे खय? खय आसा कोकीळा?     

आये  : अरे ती कोण मेल्या, तुका आता आयकाक येणाहा नाय? आता टाळो पडाक ईलो तिचो!    

बाबलो : अरे कर्मा, अगे आये ती कोक़ीळा नाय, कोकीळ तो...., कोकीळ.   

आये  : अरे कायतरी काय सागतंह, कोकीळ खयचो.    

बाबलो : खयचो, म्हन्जे आराडता तो.

आये  : आ....?

बाबलो : अगे आ.. काय. व्हयतो आराडता मा तो कोकीळच. कोकीळा कदी अशी आरडणा नाय.

आये  : ह्या मी काय आयकतय?  

बाबलो :  ताच ता.

आये  : काय?

बाबलो : कोकीळ आराडता...

आये  : मेल्या सारख्या सांग बगुया, तुझी भगल नको.

बाबलो : अगे आये, कुहू...... कुहू...... कुहू म्हणान यदळदर आराडता मा ती कोकीळा नाय. कोकीळ तो. तो...... बग काळो काळो कावळ्यासारखो दिसता मा त्या फादयेर तो कोकीळ. तोच फाटपटी पासून आरडता. रोज रोज ची ही कटकट झाल्या माज्या मस्तकाक.

आये  : कायतरी मेल्याचा.  तुका रे कसली कटकट?   

बाबलो : त....र, अगे आंबे म्होवारले तेवा पासून बगतय. ह्यो नुसतो आराडता..., आराडता...... आता पावस इलो तरी हेचा आराडणा संपणा नाय.

आये  : माजो बाबा इतको लक्ष नाय ? कित्या आरडता रे ती कोकीळा.  

बाबलो : अगे कोकीळ आराडता..., कोकीळा न्ह्यय.

आये  : ताच ता. कित्या आराडता?   

बाबलो : कित्या काय, यंदा तेची स्वर्गत जावक नाय.

आये  : अरे कोणाची स्वर्गत? काय बडबडतह काय?  

बाबलो : अगे तो कोकीळ आराडता... मा...? तेची स्वर्गत.

आये  : आ? काय? कोकीळ आराडता तेची स्वर्गत? बाबल्या राती कपाळार पडल की काय मेल्या?      
बाबलो : हो...! मे कित्या कपाळार पडतलय? निज खय येता? निजलय तर पडतलय मा?

आये  : असांदे सारक्या कायता सांग.  

बाबलो : अगे, आता आयक्शी माजा? कोकीळ आराडता मा तो कोकीळेक बोलवता. तशी एकादरी इली तर तेचा लगीन जमतला मा? तीन म्हयने गेले तरी कोण फीरकाक नाय म्हणान आजून ह्येचा आराडणा चालूच आसा. यांदा स्वर्गत काय जमणा नाय बहुदा. होय उन्हाळो गेलो.

आये  : अरे तेची कसली स्वर्गत. काय तोडाक येयत ता काय बडबडतह?  

बाबलो : अगे आये, कोकीळ  कुहू...... कुहू...... कुहू...... आराडता नाय ता समजा खयच्या तरी कोकीळेक आवाडला तर मगे ती जवळ येता. तेंची स्वर्गत जमता. आणि मगे लगीन जाता. कोकीळ आरडाचो बंद होता. माका राती नाय पण सकाळी तरी निज येता. समाज्ला तुका....?

आये  : माका बाबा तुजा काय कळणा नाय आणि तुजा लक्षणय बरा दिसणाहा हाय. मरांदे आरडांदे त्या कोकीळेक. आता उठलं मा, चाय पी आणि ती कवळा मळ्यात टाकून ये. पावस येतलोसो दिसता.     
बाबलो : येवंदे पावस, तो काय दरवर्षी येता. आमचा काय? तो मेलो कोकीळ आसा म्हणान लाज सोडून आराडता तरी.

आये  : शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार. तू बडबडत रवलस आणि माका उशीर झालो. मी चललय मळ्यात. (आये तरातरा चलत रवता)       

बाबलो : जा मळ्यातच जा. मी रवतय हयच कोकीळ आराडता तसो बोंबलत. आमची स्वर्गत यंदाय नाय. तो कोकीळ तरी आराडता. मी तसो आराडलय तर आवस ठेवची नाय. मोठ्ठी मानकरीण नाय ही, होकले रांगो लावतले म्हणान वाट बगताहा. किती वर्सा झाली, आता काय, यंदाचो मिरगय गेलो हातचो.

आराड बाबा आराड
तुजी तरी स्वर्गत जमांदे            
खय आसली कोकीळा
तर घरा येंवदे.

आ...रा...ड         

     
   

  

  
  


    
    


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates