13 August, 2010

आक्रोश







डोळ्यात आसवांची धग ही अजून ओली
अवचीत पावसाची सर ती सरून गेली

तो हुंदका कुणाचा दाबीत ओठ होता
आक्रोश वेदनांचा कानात येत होता

रंगात रंगलेला तो आसमंत गेला
चिखलात रंग सारा बेरंग होत गेला

मातीच माणसाची घटका भरून गेली
अन उब माऊलीची घटकेत दूर झाली

जो थांबला जरासा, त्याला नसे निवारा
करीती अजून दंगा, पाऊस, उन, वारा

नरेंद्र प्रभू

2 comments:

  1. तुमच्या कवितेतील व्यथा जरी खरी असली तरी निसर्गाच्या पुढे कोणाचच काहीही चालत नाही हे वास्तव आहे. २००८ मध्ये कोशीच्या पूरामुळे बिहारी बांधव कसे हतबल झाले होते ते मी जवळून पाहीले आहे.

    ReplyDelete
  2. विजयजी, निसर्ग दयामाया दाखवत नाही हे खरेच.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates