
माझं स्वैर लेखन
27 March, 2020
चागंले दिवस येतील..

26 March, 2020
राजा परिक्षीत आणि आपण

24 February, 2013
गोवा मॅराथॉन २०१३

![]() |
| गोव्याचे राज्यपाल श्री. भारत वीर वांच्छू डॉ. रामाणींचा सत्कार करताना सोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. |
माध्यमिक शिक्षणापर्यंतचे धडे गावातच गिरवल्यावर प्रेमानंद
रामाणी मुंबापुरीत दाखल झाले. न्युरोस्पायनल क्षेत्रात निक्ष्णात डॉक्टर बनून जगात
नाव कमावलं, पण वाडी-तळावली या आपल्या मुळ गावाकडे त्यांच कधीच दुर्लक्ष झालं
नाही. आपल्या प्रेमळ आईची आठवण म्हणून डॉक्टरानी अहिल्याबाई रामाणी ट्रस्ट स्थापन
करून त्या योगे आपलं राहातं घर गावाला अर्पण तर केलच पण त्याच जागेवर एक टुमदार
इमारत बांधून त्या इमारतीत ज्ञान आणि आरोग्याचा यज्ञ सतत घगघगत ठेवला. आजची
मॅराथॉन ही त्या यज्ञातलीच एक समिधा होती. २१ किलोमीटरच्या मॅराथॉनमध्ये धावणारे
धावपटू म्हणून डॉक्टर रामाणीसर होते, तसेच गावकरीही त्यात सहभागी झाले होते. एक
प्रकारे ही ज्योतीने तेजाचीच आरती चालली होती. 18 July, 2010
आपण जे खातो, तसे आपण होतो
- लहान थोरांच्या खाण्यात येणारी जंक फूडस्.
- रसायनांचा वापर करुन पिकवलेली फळफळावळ.
- कोंबडीच्या पिल्लांना हार्मोंसची मात्रा देवून बारा महिन्यां ऎवजी चार महिन्यात विक्री योग्य बनवणे.
- रंगवलेल्या भज्या.
- दुधातली भेसळ.
- मॅकडोनाल्ड, केंटूकी सारख्या अमेरिकी खाद्यपदार्थ पुरवणार्या दुकानात होणारी गर्दी.
18 March, 2010
जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता
19 October, 2009
देवा याना माफ कर
आज दिवाळीचे चार दिवस संपत आले. मागे उरला फटाक्यांचा कचरा, धुर आणि काजळी, आणि हो ठाण्यात अग्नीशमन दलाच्या सात जवानांचे मृतदेह. दिवाळी पहाट सारखे स्तुत्य उपक्रम एका बाजूला आणि दुसर्या बाजूला गल्ली-बोळात, रस्त्या-रस्त्यावर अनिर्बंधपणे वाजवले जाणारे फटाके. हल्ली मुलांचे डॉक्टर पालकांना सांगतात ‘चॉकलेट आइस्क्रीम तो बच्चोंका हक है’ त्याच चालीवर पालक मुलांबरोबर स्वतःही फटाके वाजवण्याचा हक्क बजावताना दिसले. भल्यापहाटे पासून रात्री उशीरा पर्यंत वेळेची मर्यादा ओलांडून हे बजावण चालू होतं. हे ताळतंत्र सोडून वागणं नेहमीचच झालं आहे दिवाळी फक्त निमीत्त. आता बाविस तारखेला कुणीही निवडून येवो फाटाक़्यांपासून होणारं प्रदुषण मात्र तेवढच असणार याची खात्री देतो.
हे असे विनाशकारी फटाके पर्यावरणाचं दिवाळं वाजवतातच पण चीनी बनावटीचे हे फटाके वाजवून आपणच चीनच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करतो आहोत. दुसरा मुद्दा असा की नुकत्याच परतणार्या मांसूनने “ग्लोबल वॉर्मींगचे’ धोके स्पष्ट केले आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यात एका दिवसात एवढा पाऊस पडला की त्याने मागचे सर्व विक्रम मोडले. विध्वंस केला. जागतिक तपमान वाढीचा हा धोका आता आपल्या दारात नव्हे घरात आला आहे. आता घश्याचे,द्म्याचे विकार बळावतील, आवाजाचा त्रास तमाम जनतेला झाला असणारच (वाजवणार्यानादुद्धा होतो, ते कानात बोटं घालून वाजवतात). या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा संगितल्या जात आहेत पण....., आपण स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली तर त्याला कोण काय करणार. आपण येवढच म्हणू शकतो, देवा याना माफ कर ते आपल्या बरोबर आमच्याही पायावर कुर्हाड चालवताहेत.
14 October, 2009
या नरकासूरांपासून वसूंदरेला कोण वाचवणार ?
शाळंना सुट्ट्या पडल्या आणि दिवसभर हातात पिस्तूलं घेऊन फट्... फट्... आवाज करत एकमेकांच्या मागे धावणारी मुलं दिसू लागली. जसजशी दिवाळी जवळ येईल तसतसे फटाक्यांचे आवाज वाढत जातील. करमणूकीची अनेक साधनं उपलब्ध असतानाही आणि या फटाक्यांमुळे पर्यावरणाला किती हानी पोहोचते ते माहीत असतानासुद्धा शिकलेली पालक मंडळी असं का वागतात हा खरच मोठा प्रश्न आहे. ‘फटाक्याचे तोटे’ हा प्रोजेक्ट पुर्ण करून एक अभ्यास हातावेगळा झाला म्हणून आनंदाने फटाके वाजवणारी मुलं जेव्हा मी पाहीली तेव्हा मात्र कपाळावर फटाके मारून घ्यावेसे वाटले. ‘सगळे वाजवतात, त्यात आपले’ असं म्हणून त्यात भर घालण्यापेक्षा फटाके न वाजवता प्रदूषणाला आळा घालणं किती महत्वाचं आहे हे आता तरी समजलं पाहीजे.
फटाक्यांमुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होतं. रक्तदाब वाढणे, बहीरेपण येणे, दमा, खोकला असे विकार बळावणे, स्वसनक्रियेचे आजार होणे असे अनेक त्रास फटाक्यांमुळे उद्भवतात. आगी लागण्याचा संभव असतो. फटाक्यांच्या कारखान्यात लहानमुलं काम करतात. त्यांच्या शरिरावर फटाक्यांच्या दारूचा वाईट परीणाम होवून ती प्राणाला मुकतात. कालच मतपेट्या बंद झाल्या, दिवाळीनंतर त्या उघडतील तेव्हा निवडणूकांचा निकाल लागल्यावर राज्यकारभार हातात घेवू इच्छिणारेही फटाके लावून प्रदूषणात भर घालतील.
आपण एकच करू शकतो ‘फटाके वाजवू नका’ असं आवाहन करू शकतो.
25 September, 2009
नागडे पाय

देवाचा हप्ता या ब्लॉग पोष्ट मध्ये ‘लोक साईबाबा पुढे चप्पल काढल्यासारखं करतात पण प्रत्यक्षात बुट, चप्पल पायातच असतात’ हे माझं म्हणणं एवढ्या लवकर बुंबरँग होवून माझ्यावरच उलटेल असं मला वाटलं नव्हतं. अगदी सात दिवसात देवाने मला माझं ते विधान सपशेल मागे घ्यायला लावलं. त्याचं काय झालं महाराजा, गेले चार-पाच दिवस सकाळच्या वेळी मला एक साक्षात्कार होतोय. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडलो की अनेक अनवाणी, नागडे पाय रस्त्यावरून चालताना दिसतात. (हो मी फक्त पायच पाहतो.) दोन दिवस दुर्लक्ष केलं पण ते तसे समोर येतच राहीले. सकाळीच नव्हे तर संध्याकाळी सुद्धा. हा काय प्रकार म्हणून बायको जवळ चौकशी केली तेव्हा उलगडा झाला. नवरात्रात हल्ली हे असं करतात. हे म्हणे व्रत आहे. नवरात्रात नऊ दिवस अनवाणी, अन्नपाण्या शिवाय रहायचं. (दिवसाच हा. रात्री खावून ‘पिवून’ नाचायचं).
वा..! मी या भक्तांचे चरण बघून धन्य झालो. कित्तेक जण तशी सवय नसल्याने असे काही चालतात की ती अजब चाल बघत रहावी. पण अशा टाचा घासून देव कसा पावणार ? (मला आणखी एका साक्षात्काराची वाट बघावी लागणार.) नऊ दिवस मोच्याचा धंदा बसणार, झालच तर त्या उघड्या पायांवर एखाद्याचा चपलेचा पाय पडणार.
(वर दिलेला फोटो हरेक्रिष्णजीच्या सौजन्याने)
नरेन्द्र प्रभू
13 August, 2009
रोगराई पसरवणारे मास्क

स्वाईन फ्लू मुळे अचानक शहरांचं चित्र बदलत चाललं आहे. अगोदर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्यांच्या तोंडावर आणि शस्त्रक्रिया विभागात दिसणारे मास्क आता सर्रास सगळ्यांच्या तोंडावर दिसू लागले आहेत पण त्याच्या तर्हा तरी किती ? सर्जिकल,एन 95, साधे, थर्मल पासून हात रूमाल, ओढण्या, पदर सगळच तोंडावर आलं आहे. बरं हे सगळं तोंडावर असलं तर ठिक आहे. गळ्यात, कपाळावर, नाका खाली, हातात. मास्क ताईता सारखे जवळ असले म्हणजे झालं. ज्या रुमालाने हात फुसणार तोच तोंडावर. या सगळ्या गडबडीत जीव जंतूंचं भांडार घेऊनच आपण फिरतो आहोत याच भान नसतं. कित्तेक लोक मास्क बाजूला करुन थुंकताना दिसले, शिंकताना दिसले. हेच मास्क आता रस्त्या रस्त्यावर पडलेले आढळतात. मास्क स्वच्छ पाहिजेत, रोज बदलले पाहिजेत, ते दुसर्याच्या संपर्कात य्रेता कामा नयेत. थोडक्यात मास्कची काळजी घेतली तर ते आपल्या आरोग्याची काळजी घेणार. असो, सद्या शिंप्यांची दुकान तेजीत आहेत आणि साठेबाजांची चलती आहे एवढं खरं.
11 August, 2009
स्वाईन फ्लूची दहशत
देशात विशेषतः महाराष्ट्रात सध्या स्वाईन फ्लूचा धुमाकूळ चालू आहे. त्याच्या उन्माद माजवणार्या बातम्या प्रसारमाध्यमातून ऎकायला मिळाताहेतच पण अशा वेळी मायबाप सरकार कडून सामान्य नागरीकांची जी अपेक्षा आहे ती मात्र पुर्ण होताना दिसत नाही. दहशत मग ती २६/११ ची असो की स्वाईन फ्लूची जनता निर्नायकी असल्यासारखी आहे. ज्यांनी नेतृत्व करायच ते हात वर करून बसलेत. लोक हवालदील झाले असताना राज्याला दिशानिर्देश देणारं सरकार नाही की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. राज्य सरकार काही निर्णय घेणार नाही, मग निर्णय कुणी घ्यायचे तर स्वयंघेषीत सुभेदारांनी, जिल्हाधिकार्यानी, शाळाचालकांनी, महापालिका आयुक्तांनी आणि सरते शेवटी मुलांच्या पालकांनी. आम्ही फक्त मलीदा खाणार, अर्धवट बांधकाम झालेल्या पुलांची उद्घाटन करणार, नवीन टेंडरं काढणार, स्वतःची थोबाडं असलेले बोर्ड लावून अनाहूत सल्ले देणार आणि शहर विद्रूप करणार, नवीन टोल नाके उभे करणार, भुखंड हडप करणार्या या डुक्करांनीच दहशतीच्या स्वाईन फ्लूची लागण व्हायला दिली आहे, जेणे करून येत्या निवडणूकीत जनतेने महागाई विसरावी, आपली शेखी मिरवण्यासाठी याना दही-हंडी, गणेशोत्सव पाहीजे. सज्जनतेचे आव आणलेली यांची कटाआऊट मोठी आणि शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक शोधावे लागतात.
या सगळ्या सावळ्यागोंधळात एकेका सुभेदाराचं फावलय. एक दादा आपल्या जिल्ह्यातली शाळा-कॉलेजं बंद ठेवतो तर शाळांचे सुभेदार मनमानी निर्णय घेताहेत. एकाच रस्त्यावरची एक शाळा बंद तर दुसरी उघडी. मेडिकलवाले दामदुप्पटीने पैसे वसुल करून मास्क विकताहेत. लोक आता स्वाईन फ्लू विसरे पर्यंत एकच मास्क लावून फिरणार त्यामुळे स्वाईन फ्लू राहिला बाजूला पण दुसर्याच रोगाची शिकार होणार. पण एक आशेचा किरण दिसतो आहे वसई-विरारचा धडा राजकारण्यांनी विसरू नये. तोपर्यंत असे दादा, भाई, रावजी, पंत आजुबाजुला फिरकलेच तर जरा त्यांच्या तोंडावर खोका. प्रतिक्रीया पहा.
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
मालवणी नाटकांचा अनभिषीक्त सम्राट मच्छिंद्र कांबळी आणि लेखक गंगाराम गवाणकर यांनी केवळ एक नाटक केलं असतं तरी ते नट आणि नाटककार म्हणून याच उंची...
-
आज एका इ - मेलने मला खुप अस्वस्थ केलं . ही छायाचित्र बघा काय सांगतात . समस्त सर्पयोनीचा आक्रोश एका इ - मेलमुळे मला ऎकू आला . माणूस कोणत्या...
-
कालच ‘ अवघा रंग एकचि झाला ’ हे नाटक बघीतलं. बर्याच वर्षांनंतर संगीत नाटक बघायला गेलो होतो, गेल्या काही वर्षात संगीत नाटकाची परंपरा खंडीत...
-
थबकल्या झिम्माड धारा , स्तब्ध ही उनाड वारा नाविकाचे गीत माझ्या , ऐकती करिती किनारा लोक भेटायास आले , निशब्द होऊन गेले शब्द-शब्द कवितेत...
-
कोकणात आणि गोव्यात नरक चतुर्दशी पासून दिवाळीला सुरवात होते. नरक चतुर्दशीच्या पहाटे श्रीकृष्णाने नरकासु राचा वध केला. गोव्यात हे नरकासु राचे...
-
स्पिती व्हॅली मधलं लांझा हे जीवाश्म गाव ( Fossil village). समुद्रसपाटीपासून १४५०० फुट उंचीवरच्या या गावात फिरताना पायाखालच्या जमिनीवर तु...
-
छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन करताना अधिक शिरोडकर साहेब तसे शिरोडकर साहेब नेहमीच भेटत असतात. कधी वर्तमान पत्रातून, कधी दूरदर्शन वाहिन्य...
-
आजच्या लोकसत्तामध्ये मुंबई-पुण्यात दूध पिशव्यांतून मिळते ‘ विष ’! हि बातमी वाचली. आम्ही गोकूळचं दूध घेतो. आता गोकूळ असो नाहीतर इतर कुठल्या...
-
काल श्रीपाद आगाशे यांची भेट झाली. एक माणूस एखाद्या कार्याला वाहून घेतल्यावर किती काम उभं करू शकतो याचं श्री. आगाशे हे एक उत्तम उदाहरण आहेत. ...


