30 March, 2019

टेरर फंडीगला मोदी सरकारचा दणका


टेरर फंडीगला मोदी सरकारने जोरदार दणका दिला आहे. श्रीनगर मध्ये वर्षानुवर्षं ठाण मांडून बसलेल्या आणि पाकिस्तानच्या पैशावर पोसल्या गेलेल्या दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी टेरर फंडीगचा माग घेण्यासाठी सरकारने कृती गट स्थापन केला आहे.

मोदी सरकारच्या याच धोरणाला आता यश येत असून सक्त वसूली संचालयाने (ED) काल फुटीरतावादी नेता शाबीर शाह याची श्रीनगरमधील संपत्ती जप्त केली आहे. त्याला हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा होता होता. चौदा वर्षे जुन्या दहशतवाद अर्थपुरवठा  व काळ्या पैशाच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले.

जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील रावळ पोरा भागात एफंडी बाग येथे शहा यांची मालमत्ता असून ती जप्त करण्याचे आदेश सक्तवसुली संचालनालयाने काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दिले होते. सरकारने सध्या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यास सुरूवात केली असून त्यात दहशतवादाच्या आर्थिक नाडय़ा तोडण्याचा हेतू आहे. शाबीर शाह व त्याची पत्नी यांच्या नावे २५.८ लाख रूपये किमतीचे हे घर असून ते जप्त करण्यात आले आहे. शाह हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याचा अनेक बेकायदेशीर कारवायांत हात आहे. त्याचा साथीदार महंमद अस्लम वाणी हा जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. शाह हा वाणी याच्या माध्यमातून हवालाचा पैसा गोळा करीत होता. हा पैसा  पाकिस्तानातून येत होता. सक्तवसुली संचालनालयाने म्हटले आहे, की १९९९ मध्ये  त्याच्या सासऱ्यांनी हे घर त्याच्या नावाने खरेदी केले होते. नंतर ते शाह याची पत्नी व मुलींना त्याच्या मेहुणीने भेट म्हणून दिले. शाह याचे सासरे व मेहुणी याना या घरासाठीचे पैसे कुठून आणले याचे स्पष्टीकरण करण्यासाठी बराच अवधी देण्यात आला होता. चौकशीत असे निष्पन्न झाले, की शाह हा या मालमत्तेचे खरा मालक असून त्यालाही सासऱ्याने हे घर कुठल्या पैशातून घेतले हे सांगता आले नाही.

हाफिज सईदकडून पैशांचा पुरवठा
शाबीर शाह हा जागतिक दहशतवादी हाफिज सईद याच्या संपर्कात होता व त्याच्याकडून दहशतवादी कारवायांसाठी पैसे स्वीकारत होता. अनेक संशयास्पद व्यवहार करून त्याने मालमत्ता जमवल्या असून शाह व वाणी यांना २०१७ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. वाणी याला जानेवारी २०१९ मध्ये जामीन मिळाला आहे. ऑगस्ट २००५ मध्ये दिल्ली पोलिसांनी वाणी याला शाबीर शाह यांना २.२५ कोटी रूपये हवालामार्गे दिल्याच्या आरोपावरून अटक केली होती.    

29 March, 2019

टेरर फंडिंग: ११ हुर्रियत नेत्यांची संपत्ती जप्त होणार



आतंकवादाविरुद्ध मोदी सरकारने सक्त पवित्रा घेतला असून टेरर फंडिंगचं कंबरडं मोडण्याचा निर्धार केला आहे. गेले काही महिने चालू असलेली कडक कारवायी आणखी पुढे नेत टेरर फंडिंगमधून जवळ केलेली माया जप्त करण्याचं सरकारने ठरवलं आहे सरकारने ११ हुर्रियत नेत्यांची संपत्ति जब्त करण्याचा आदेश दिला आहे.


११ हुर्रियत नेत्यांमध्ये हिजबुल मुजाहिदीन चा मुख्य सैयद सलाउद्दीन, सैयद अली शाह गिलानीचा जावयी अल्ताफ फंटूश, नईम अहमद खान, फ़ारुख अहमद डार उर्फ बिट्टा कराटे, शहीदुल इस्लाम, पाकमध्ये असलेला हिज्बुल चीफ सैय्यद सलाउद्दीन, अकबर खंडी, पीर सैफुल्ला,राजा मेहराजुद्दीन यांचा समावेश आहे. सरकारने या सर्वाच्या संपत्तीची खातरजमा केली असून ही  संपती त्यांनी टेरर फंडीगमधून जमवली आहे.

सरकारने या सर्व फुटीरवाद्यांची गठडी वळव्याचा पूर्ण रोड मॅप तयार केला आहे.

28 March, 2019

‘मिशन शक्ती’बद्दल जगभरातील प्रसारमाध्यमं काय म्हणतात?








भारतीय वैज्ञानिकांनी मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळातील लो अर्थ ऑरबिट उपग्रहाला ऍन्टी सॅटेलाईट क्षेपणास्त्राव्दारे नष्ट केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

पोखरणमध्ये केलेल्या अणूस्पोटासारखेच या घटनेला महत्व आहे.   
भारतातले विरोधी पक्ष आणि पेड मिडीया आणि पत्रकार मात्र मोदींवरच टीका करत आहेत. मोदींजींना या घटनेचं श्रेय मिळू नये म्हणून आटापीटा चालला आहे.

म्हणूनच जगभरातील प्रसार माध्यमांचं या घटनेवर काय मत आहे याच्या तब्बल २३ लिंक खाली देत आहे, जिज्ञासूनी त्याचा लाभ घ्यावा. आपल्या देशासाठी अतिशय अभिमानास्पद अशी ही घटना आहे.

























अंतराळातही सर्जिकल स्ट्राइक, पोखरण सारखंच मोठं यश!




'मिशन शक्ति' या उपक्रमाव्दारे भारताने अंतराळातही सर्जिकल स्ट्राइक केला आहे.  

पोखरण सारखीच गुप्तता पाळल्यागेलेल्या या  'मिशन शक्ति'ची फक्त ५-६ जणांनाचा कल्पना होती.

डीआरडीओचे माजी प्रमुख की व्ही. के. सारस्वत यानी म्हटलं आहे की संपुआप्रणित सकारने २००८ मध्ये या मोहिमेची आखणी केली होती. त्यानंतर वेगाने हालचाली करत २०१२ मध्ये तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला शक्तीमोहिमेसंबंधी सादरीकरण करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने आम्हाला त्यावेळी संपुआ सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून आम्ही त्यावेळी पुढे जाऊ शकलो नाही. परंतु,  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने सकारात्मकता दर्शविल्यानंतर पंतप्रधान मोदींनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळेच आज २०१९ मध्ये भारताला हे यशोशिखर गाठता आले.

ए-सॅट क्षेपणास्र म्हणजे काय ?
एन्टी सॅटेलाईट हत्यारे (A-SAT weapon) ही मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रहांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात. हेरगिरी करणाऱया अंतराळातील उपग्रहांना हाणून पाडण्याची अशी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमताआत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतही याबाबतीत सक्षम झाला आहे.

डीआरडीओ च्या या प्रकल्पात गेल्या ६ महीन्यांपासून ३००  वैज्ञानिक आणि इतर दिवस-रात्र काम करीत होते.

'मिशन शक्ति' र प्रतिक्रिया देताना अमेरिकेच्या गृह खात्याने म्हटलं आहे की 'उपग्रह विरोधी मिसाइल परीक्षणासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं आहे. भारत-अमेरिका यांचं हित आणि सुरक्षा या बाबतीत अमेरिका या पुढेही सहयोग देत राहिल.  

भारतीय वैज्ञानिकांनी मिशन शक्ती यशस्वी करून अंतराळातील लो अर्थ ऑरबिट उपग्रहाला ऍन्टी सॅटेलाईट क्षेपणास्त्राव्दारे नष्ट केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे. याबद्दल इस्रोचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. अत्यंत कमी कालावधीत पृथ्वी प्रदक्षिणा करण्याची गती असणारा उपग्रह टिपणारा अमेरिका, चीन आणि रशियानंतरचा भारत हा जगातील चौथा संपन्न देश बनला. ही घटना अभिमानास्पदच आहे. भारतावर गस्त घालणाऱया किंवा अंतराळातून भारताची हेरगिरी करणाऱया कोणत्याही परकीय उपग्रहाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता भारत बाळगून आहे हे यातून सिद्ध झाले.
जगभरातून पंतप्रधानांच्या कणखर भूमिकेचे समर्थन आणि देश कसा कणखर हाती सुरक्षित आहे याचे गुणगाण गायिले गेले. काँग्रेसकडून अपेक्षितपणे ही वाटचाल पं. नेहरू यांच्या काळापासून कशी सुरू आहे याचा उल्लेख येऊ लागला. आज झालेली कामगिरी ही काही काल, आजची नाही. २००८ ते २०१२ या काळात हे काम सुरू झाले आणि २०२० साली ते पूर्ण होणार होते. शास्त्रज्ञांनी ते त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण केले आहे. इस्रोने केलेल्या कामगिरीमुळे त्या त्या वेळच्या पंतप्रधानांची प्रतिमा उंचावलेलीच आहे. पं. नेहरूंनी या देशात अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणताना डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव मागे पडतेच.

१९६२ साली देशात सुरू झालेल्या अंतराळ कार्यक्रमापासून ७५ साली देशाने रशियाच्या मदतीने सोडलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, ७६ सालचा उपग्रहाव्दारे शिक्षणाचे प्रयोग, ७९ साली दुसरा उपग्रह भास्करची स्थापना, १९८० चा पहिला भारतीय निर्मित आणि प्रक्षेपित उपग्रह रोहिणी हे यश आणि भारतीय प्रगती अमेरिकेच्या डोळय़ात खुपताना जगाने पाहिली आहे. आता मात्र अमेरिका सहकार्याची भाषा करीत आहे हे मोदी सरकारच्या परराष्ट्र नितीचं यश आहे. १९९२ साली अण्वस्त्र बंदी कार्यक्रमाच्या आडून रशियावर दबाव आणत भारताला एकटे पाडले. २०१४ सालापर्यंत भारताने या क्षेत्रात एकाकी वाटचाल केली. जीसॅट ३ ते १४ ही वाटचाल त्या काळातच झाली. जीएसएलव्ही डी ५  आणि प्रक्षेपणात स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करून १९९२ साली पूर्ण होणारे स्वप्न भविष्यात आपल्या देशाने स्वतःच्या ताकदीवर सत्यात उतरवले. मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भारताने टेलिफोन, संगणक क्रांती केली होती. आता स्वतःबरोबरच जगातील २० देशांचे ५६ उपग्रह कमी किंमतीत आणि अचूक ठिकाणी स्थापित केले. अमेरिका, चीन आणि रशियाला मागे टाकले. आजही प्रक्षेपणासाठी परवडणारा देश म्हणून प्राधान्य दिले जाते हे भारताचे यश आहे.

पोखरणमध्ये केलेल्या अणूस्पोटासारखेच या घटनेला महत्व आहे.   

27 March, 2019

अंतराळ युद्धासाठीही भारत सज्ज




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्याची घोषणा केली. भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक लो अर्थ ऑर्बीट म्हणजे LEO उपग्रह पाडण्यात यश मिळवल्याची माहिती मोदींनी दिली आहे. असा पराक्रम करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे तंत्रज्ञान वापरणारा भारत हा जगातील चौथा आहे. मिशन शक्तीअसं या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण तंत्रज्ञान भारतीय बनावटीचे आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे

  1. भारताने जमिनीपासून ३०० किलोमीटर अंतरावर असणारा उपग्रह यशस्वीरित्या पाडला.
  2. अशापद्धतीने लाईव्ह उपग्रह पाडण्याची भारताची पहिलीच वेळ आहे.
  3. डीआरडीओच्या शास्ज्ञज्ञांनी या मोहीमेत महत्त्वाची भूमिका निभावली.
  4. तीन मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले. लो अर्थ ऑर्बिटमध्ये ३०० किलोमीटर अंतरावरुन अचूक लक्ष्यभेद करण्यात यश.
  5. लो अर्थ ऑर्बीट म्हणजे LEO प्रकराचे हे उपग्रह हेरगिरीसाठी वापरले जातात.
  6. मिशन शक्तीनावाने राबवण्यात आलेली ही मोहीम भारतीय वैज्ञानिकांचे मोठं यश आहे.
  7. या माध्यमातून भारताच्या ए सॅट क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण करण्यात आले.
  8. जमिनीवरून क्षेपणास्त्रांच्या मदतीने अंतराळातील घातक उपग्रहांवर हल्ला करणारा चौथा देश ठरला आहे.
  9. अमेरिका, रशिया आणि चीननंतर हे तंत्रज्ञान वापरणार भारत हा जगातील चौथा देश ठरला.
  10. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही.

आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली.
आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही.

अंतराळात भारताचे ‘मिशन शक्ती’



अंतराळात भारताचे मिशन शक्ती’; अमेरिका, चीन, रशियानंतरचा चौथा देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना संबोधित केले. भारताकडून क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात यश आले असून अशा स्वरुपाची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरल्याची माहिती मोदींनी दिली. आम्ही ही मोहीम कोणत्याही देशाविरुद्ध राबवली नाही. आम्ही भारताच्या नागरिकांची आणि देशाची सुरक्षा यासाठी ही मोहीम राबवली. आम्हाला जगात शांतता कायम ठेवायची आहे, आमचा युद्धाचा हेतू नाही, असे त्यांनी सांगितले.

बुधवारी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येत आहे, अशा आशयाचे ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना मोदी नेमके काय बोलणार, याकडे देशभराचे लक्ष होते. अखेर दुपारी मोदींनी देशवासीयांना संबोधित केले. यात मोदींनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या मिशन शक्तीविषयी माहिती दिली.

या अंतर्गत भारताने अंतराळात क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडल्याची माहिती मोदींनी दिली. लो अर्थ ऑर्बिटमध्ये भारताने अँटी सॅटेलाइट मिसाइलद्वारे (उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र) एक उपग्रह पाडले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये हे उपग्रह पाडण्यात आले. ३०० किलोमीटर अंतरावरुन लक्ष्यभेद करण्यात यश आले असून ही चाचणी यशस्वी झाल्याने अंतराळातही भारताची सुरक्षा भक्कम झाली आहे. अँटी सॅटेलाइट मिसाइलमुळे देशावर नजर ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपग्रहांवर वचक ठेवणे शक्य होणार आहे.

26 March, 2019

भारतीय बनावटीच्या ‘तेजस’मध्ये मलेशियाला रस



भारताच्या तेजसफायटर विमानामध्ये मलेशियाने रस दाखवला आहे. त्यामुळे भारत हे विमान मलेशियाला विकण्याचा प्रयत्न करत आहे. तेजसहे भारताने विकसित केलेले स्वदेशी बनवाटीचे हलके लढाऊ विमान आहे. मलेशियामध्ये होणाऱ्या एअर शो साठी अन्य ५० विमानांसोबत तेजस क्वालालंपुरमध्ये दाखल झाले आहे.

दोन तेजस विमाने मलेशियातील एअर शो मध्ये सहभागी होणार असून आपले कौशल्य सादर करणार आहेत. मलेशियन एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांसह अन्य प्रेक्षक तेजसच्या क्षमतेने प्रभावित होतील अशी भारताची अपेक्षा आहे. २६ मार्चपासून हा एअर शो सुरु होणार आहे.

मलेशियन सरकारनेच जेएफ-१७, एफ/ए-५० या फायटर विमानांसह तेजसची निवड केली आहे असे क्वालालंपुरमधील भारतीय उच्चायुक्तालयातील अनिरुद्ध चौहान यांनी सांगितले. जेएफ-१७ हे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे विकसित केलेले तर एफ/ए-५० हे दक्षिण कोरियाने विकसित केलेले फायटर विमान आहे.

भारत आजपर्यंत विमानं आयात करीत होता आणि आधिच्या सत्ताधार्‍यांना फक्त कमिशन मध्येच रस होता. मोदीसरकार आल्यापासून ही बाब बदलली आहे.     

24 March, 2019

एसबीआयकडून कर्ज बुडव्यांची संपत्ती विक्रीस




सध्या अनेक बँकांकडून व खासगी फायनान्स कंपन्यांकडून अनेक कारणांसाठी कर्जे घेतली जातात. परंतु ती कर्जदारांकडून वेळेत परतफेड केली जात नाहीत त्यामुळे बँकांना व अन्य कर्ज देणाऱया कंपन्यांना मोठी तडजोड करावी लागते. तर सध्या देशातील सरकारी कार्यक्षेत्रात कार्यरत असणारी सर्वात मोठी बँक म्हणून भारतीय स्टेट बँपेला (एसबीआय) ओळखले जाते. याच बँकेकडून चालू महिन्यात कर्ज बुडव्याची हजार १६९ कोटी रुपयाच्या संपत्तीचा लिलाव करणार असल्याची घोषणा केली आहे. कर्जदाराची सध्याची संपत्ती आणि त्यांची होणारी किंमत यांच्यावर अंतिम बोली लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

एसबीआय आजपासून ३० मार्चपर्यंत पूर्व योजनेचा आराखडा तयार करणार आहे. त्यातून संबंधीत कर्ज बुडव्यांची संपत्ती विक्रीस काढणार असल्याचे सांगण्यात आले.

आजपर्यंत अशा कर्ज बुडव्यांना राजकिय आश्रय मिळत होता, आता ते दार बंद झालं आहे. कर्ज घेतल्यास ते सव्याज फेडावंच लागेल.    

23 March, 2019

काश्मीरमधील फुटीर ‘जेकेएलएफ’वर बंदी



जेकेएलएफनेच १९८९मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्या घडविल्या होत्या.

जम्मू आणि काश्मीरमधील फुटीर विचारसरणी पोसणारी सर्वात जुनी संघटना असलेल्या जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ (जेकेएलएफ) या यासिन मलिकच्या नेतृत्वाखालील संघटनेवर शुक्रवारी केंद्र सरकारने बंदी घातली. देशविघातक शक्तींवरचा हा मोदी सरकारचा आघात आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १९८८पासून फुटीर चळवळीद्वारे काश्मीर खोऱ्यात घातपाती कारवायांना बळ दिल्यावरून ही कारवाई झाल्याचे केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दहशतवादाविरोधातील केंद्राच्या कठोर धोरणानुसार हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.  जेकेएलएफनेच १९८९मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या सामूहिक हत्या घडविल्या होत्या. त्यामागे यासिन मलिकच होता, असे गौबा म्हणाले. जेकेएलएफने अनेक गुन्हे केले आहेत. त्यात हवाई दलाच्या चार जवानांची हत्या आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती महम्मद सईद यांची कन्या रुबिया यांचे अपहरण, यांचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

काश्मीरमधील घातपाती कारवायांसाठी अन्य गटांना तसेच दगडफेक करणाऱ्या तरुणांना ही संघटना आर्थिक रसदही पुरवत असल्याचे उघड झाले आहे, असे ते म्हणाले. यासिन मलिक हा जम्मूच्या कोट बालावर तुरुंगात आहे. तीन दशकांपूर्वीच्या रुबिया सईद अपहरण प्रकरणातील  तसेच चार जवानांच्या हत्या प्रकरणातील खटल्याला तो सामोरा जाणार आहे.

जेकेएलएफची कूळकथा..

  • पाकिस्तानी नागरिक अमानुल्ला खान याने या संघटनेची स्थापना केली होती.
  • १९७१मध्ये श्रीनगर-जम्मू विमानाचे अपहरण करून ते पाकिस्तानात नेल्यानंतर ही संघटना प्रसिद्धीस आली होती.
  • या संघटनेवर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ३७ गुन्हे नोंदवले आहेत, तर सीबीआयने दोन गुन्हे नोंदवले आहेत.
  • १९८४मध्ये भारताचे ब्रिटनमधील मुत्सद्दी अधिकारी रविंद्र म्हात्रे यांच्या हत्येतही या संघटनेचाच हात होता.
  • महिनाभरात बंदी घातलेली काश्मीरमधील ही दुसरी संघटना आहे. याआधी जमात ए इस्लामीवर बंदी घालण्यात आली आहे.


काश्मीरचाच तुरुंग! : जेकेएलएफवर बंदी घालणे हे हानीकारक पाऊल असून त्यामुळे काश्मीरचे रूपांतर खुल्या कारागृहात होईल, असे पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. काश्मीरचा प्रश्न दहशतवादाच्या मार्गाने सोडविण्याचा मार्ग यासिन मलिकने केव्हाच सोडून दिला आहे, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी मलिकला चर्चेसाठीही पाचारण केले होते, त्यामुळे त्याच्या संघटनेवर बंदी घालून काय साध्य होणार आहे, असा सवाल मेहबूबा यांनी केला आहे.

आजवर कुठल्याच सरकारने अशी कारवायी केली नव्हती, ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे. या आधीचं सरकारा कसं वागत होतं याचा हे प्रातिनिधीक चित्र.

   


फुटीर हुरियत नेता गिलानींला १४.४० लाखांचा दंड



हुरियत कॉन्फरन्सचा नेता सय्यद अली शहा गिलानी याला सक्तवसुली संचालनालयाने सतरा वर्षे जुन्या प्ररकरणात १४.४० लाख रुपये दंड केला आहे. त्याने त्यावेळी १० हजार डॉलर्स बेकायदेशीररीत्या बाळगले होते. २० मार्च रोजी परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करून त्यांच्याजवळील ६.९० लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले होते.


गिलानी याच्या श्रीनगरमधील हैदरपोरा भागातील निवासस्थानी २००२ मध्ये टाकण्यात आलेल्या  छाप्यातही परकीय चलन जप्त करण्यात  आले होते. गिलानी याच्याविरोधातील प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याने गिलानी यांना दंड करण्याचा निर्णय घेऊन दंडाचा आदेश दिला. गिलानी हा  हुरियत कॉन्फरन्सचा नेता असून तो जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये असतो.

सक्तवसुली संचालनालयाने या प्रकरणी प्राप्तिकर खात्याच्या अहवालानंतर दखल घेतली असून गिलानी याला श्रीनगर येथे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गिलानी याच्या वकिलाने लेखी उत्तर दिले असून त्याच्या निवासस्थानी परकीय चलन सापडल्याचा इन्कार केला आहे. फेमा कायद्यानुसार परकीय चलन व्यवहारात सर्वसाधारण किंवा विशेष परवाना आवश्यक असतो तो न घेता गिलानी यांनी परकीय चलन जवळ बाळगले होते.

गिलानी यांच्याकडे कुठलीही परवानगी नसताना त्याच्या निवासस्थानी छाप्यात परकीय चलन सापडले होते. त्यामुळे त्याला परकीय चलन जप्त का करण्यात येऊ नये अशी नोटीस देण्यात आली होती. त्याला स्पष्टीकरणासाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली होती. अशीच कारवाई फुटीरतावादी यासिन मलिक याच्यावर होणार असून त्याने परकीय चलन बेकायदेशीररीत्या जवळ बाळगले होते. तो जम्मू-काश्मीर मुक्ती आघाडीचा माजी अध्यक्ष आहे.

आजवर कुठल्याच सरकारने अशी कारवायी केली नव्हती, ही गोष्ट दखल घेण्यासारखी आहे.  

21 March, 2019

हवाई दलाच्या ताफ्यात चिनूक हेलिकॉप्टर्स



भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात पुढच्या आठवडयात अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश होणार आहे. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफा वाहून नेण्यास सक्षम असून चीन-पाकिस्तानला लागून असलेल्या उंचावरील प्रदेशात सैनिकांची तैनाती करणे आता अधिक सुलभ होणार आहे.

सप्टेंबर २०१५ मध्ये अमेरिकन कंपनी बोईंग बरोबर ८,०४८ कोटी रुपयांचा चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदीचा करार करण्यात आला होता. पंधरापैकी पहिल्या चार हेलिकॉप्टर्सचा चंदीगड येथील हवाई दलाच्या १२६ हेलिकॉप्टर युनिटमध्ये समावेश होणार आहे. सध्या या युनिटकडे रशियन बनावटीची दोन एमआय-२६ हेलिकॉप्टर आहेत.

१९९९ साली कारगिल युद्धाच्यावेळी तोफा तसेच २०१३ मध्ये उत्तराखंड पुराच्यावेळी बुलडोझर पोहोचवण्याची कामगिरी एमआय-२६ हेलिकॉप्टर्सनी पार पाडली होती. एमआय-२६ चे आयुर्मान वाढवण्यासाठी व आणखी सुधारणांसाठी हे हेलिकॉप्टर्स रशियाला पाठवण्यात येणार आहेत. चिनूकच्या तुलनेत एमआय-२६ मोठे हेलिकॉप्टर आहे. २० टन वजन आणि ८२ युद्ध सज्ज सैनिक वाहून नेण्याची एमआय-२६ ची क्षमता आहे.

चिनूकची फक्त १० टन वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. मार्च २०२० पर्यंत सर्व १५ हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला सुपूर्द करण्यात येतील. चिनूक प्रमाणचे एएच-६४ ई अपाची लढाऊ हेलिकॉप्टर्सही जुलै २०१९ ते मार्च २०२० दरम्यान भारतीय हवाई दलात दाखल होतील. सप्टेंबर २०१५ मध्ये १३,९५२ कोटींचा करार करण्यात आला. पठाणकोट आणि जोरहाट तळावर ही हेलिकॉप्टर्स तैनात होतील.

भारताच्या संरक्षण दलांची एवढी वर्षं होणारी हेळसांड मोदी सरकारने अधिकारावर आल्यानांतर दूर केली आहे तीन्ही संरक्षणा दलांना सज्ज केलं आहे.  


रंग सोहळा


प्रिय मित्र आत्माराम परब यांनी Plitvice National Park, Croatia येथे
टिपलेलं हे छायाचित्र पाहून सुचलेली कविता.


रंग सोहळा हा सृष्टीचा
खेळत आहे कान्हा रे
नवरंगांनी न्हाली धरती
पदर तीचा हा ओला रे

ती खेळत आहे राधा तिकडे
गोपी आल्या आल्या रे
पिचकारी कृष्णाची मागून
सचैल होऊन गेल्या रे

कात टाकली वसुंधरेने
रंग बहरले आता रे
निळा, जांभळा, लाल, केशरी
वरून दुधाच्या धारा रे

अपुर्व आहे रंगोत्सव हा
रंग उसळले सारे रे
वाहत आहे आसमंत हा
तना-मनातून सारा रे

नरेंद्र प्रभू
२१/०३/२०१९

20 March, 2019

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक



पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे.


पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली आहे. त्याला लंडन येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण करण्याच्या प्रकरणाची आता सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे. याचदरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाकडून नीरव मोदीची संपत्ती विकली जाऊ शकते.

वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर नीरव मोदीला कधीही अटक केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते.

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये ऐषोरामी जीवन जगत होता. तो लंडनमधील वेस्ट एंड परिसरातील सुमारे ७३ कोटी रूपये किंमत असलेल्या अर्पाटमेंटमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येते. नुकताच त्याला माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी टिपले होते.

भारतात आर्थिक अपराध करून पळालेल्या आरोपींना आता जास्त दिवस मोकळीक मिळणार नाही हे यामुळे सिद्ध झाले आहे.    

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates