आज सकाळी गावात फेरफटका
मारून मी आणि हर्षदा रिसॉर्टला परतत असताना गेटवरच कामत साहेब भेटले, मुख्य म्हणजे
स्वत:हून बोलले. इथे रहायला आवडलं का? कसं वाटलं? शांतता अनुभवायची असेल तर अशा
ठिकाणी राहीलं पाहिजे म्हणाले. गडबड, गोंधळ, ढॅनच्याक-ढॅनच्याक या पासून दूर त्या
शांततेचा आवाज ऎकण्यासाठी आमच्यासारखे ते सुद्धा आरोंदयाला आले होते. बरोबर एक
डॉक्टर होते. गोव्यात घर असूनही आम्ही इथे शांततेच्या शोधात आलेले ऎकून त्याना खुप
बरं वाटलं. फोटो काढले आणि निरोप घेतला. विठ्ठल कामत, एवढ्या मोठ्या साम्राज्याचा
अधिपती, पण कसला डामडौल नव्हता. छोट्याशाच भेटीत मोठ्ठा आनंद मिळाला.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment