24 May, 2014

काश्मीरी पंडीतांचं पुनर्वसन होणार


काश्मीरी पंडीतांच्या मालमत्ता हडपणारे सशस्त्र अतिरेकी 

१९९० च्या जानेवारी महिन्यात एका काळरात्री काश्मीरी पंडीतांवर घाला घातला. विघटनवादी पाकिस्तान्यांनी आणि त्यांना साथ देणार्‍या श्रीनगर मधल्या मुसलमानांनी हाडं गोठवून टाकणार्‍या कडाक्याच्या थंडीत काश्मीरी पंडीतांवर हल्ला केला. नेसत्या वस्त्रानीशी त्या काळेखात काश्मीरी पंडीतांच्या स्वप्नांची आणि कित्येकांच्या जीवनाची राखरांगोळी झाली. सुमारे पाचलाख काश्मीरी पंडीत विस्थापीत झाले. श्रीनगरच्या नंदनवनात सुखात जगणार्‍या या भारतीयांना आपल्याच देशात पुन्हा एकदा ‘सरहद्द’ पार करावी लागली. देशाच्या विविध भागात गेली पंचवीस वर्षं ही पिडीत जनता पॉलिथीनच्या छपराखाली हालाखीचं जीवन जगत आहे. या काळात त्यांच्या मालमत्ता अतिरेक्यांनी बळकावल्या आहेत.
जीवनाची पहाट होण्याआधीच आघात झाला.
  

हलाकीचं जीणं  



पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी काश्मीरी पंडीतांच दु:ख जाणून घेताना. 

आजवरच्या केंद्र तसच जम्मू-काश्मीर सरकारांनी त्यांच्या पुनर्वसनाच्या अनेक घोषणा केल्या पण त्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी कागदावरच राहिल्या. आता मोदी सरकार येवू घातलं असताना प्रत्यक्ष शपथ घ्यायच्या आधी कामा सुरूवात झाली आहे. काश्मीरी पंडीतांचं पुनर्वसन दृष्टीपथात आलं आहे. 
          
२००७ साली श्रीनगरमध्ये काश्मीरी पंडीतांच्या मालमत्ता आणि शाळांची मी टिपलेली दृश्य मनाला हेलावून गेली. आता त्या आपल्या बांधवांसाठी खरंच “अच्छे दिन” येणार.

काय योजना आहेत:

मोदी जी के आने के साथ काश्मीरी पंडितों के लिए शुभ सूचना:-
1. उनको पुनः कश्मीर में बसाने का कार्य प्राथमिकता के साथ किया जाएगा।।

2. प्रत्येक कश्मीरी पंडितों के विस्थापित परिवार को जमीन न होने पर 12 लाख रूपए एवं जमीन होने पर 8 लाख रूपए मिलेंगे।।

3. प्रत्येक कश्मीरी परिवार के 1 व्यक्ति को सरकारी नौकरी मिलेगी।।

4. विद्यालय जाने वाले उनके बच्चों को 1000 रूपए/प्रतिमाह का वजीफा दिया जाएगा।।

5. इनके परिवारों को उचित सुरक्षा दी जायेगी और घाटी में अमन-चैन और आपसी प्रेम सद्भाव के माहौल के लिए बड़े स्तर पर प्रयास शुरू किये जायेंगे।।

6. कश्मीरी पंडितों को पुनः बसाने के लिए युद्धस्तर पर अभियान शुरू किया जाएगा और प्रत्येक विस्थापितों को उनके कागजों की जांच करके शासन द्वारा लाभ का फायदा मिलेगा।।

धन्यवाद।। कोटिशः आभार मोदी जी।।
वन्दे मातरम्

आपल्या मायभूमीत असले फलक दाखवणारं नामर्द सरकार तेव्हा सत्तेत होतं.


कारगील युद्धानेही पंडीतांचे हाल थांबले नाहीत. 


यांना अधिकार द्या.


अशा नजरेने पाहण्याची हिम्मतही होता नये. 


हीच ती काश्मीरी पंडीतांची उजाड घरं. 


हे घर गेल्या पंचवीस वर्षांपासून वाट बघतय. 


देव नाही देवालयी


जाळपोळीतून शाळाही सुटल्या नाहीत. 


आकाश मोकळं होत आहे.


आता नुसती पान नाही तर कमळ फुललं आहे. 


या फुलांमध्ये आता कमळही मानाचं स्थान घेईल.


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates