11 January, 2009

जागे व्हा ! अजून हल्ला बाकी आहे !!!

मॅजेस्टीक गप्पांमध्ये 'युध्द दहशतवादाशी' या विषयावर नुकताच एक परिसंवाद झाला. या परिसंवादात सहभाग होता

  1. संदीप वासलेकर, स्ट्रॅटॅजिक फोरसाइट ग्रुपचे प्रमुख  ,आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे अभ्यासक

  2. व्ही. एन. देशमुख, राज्य गुप्तचर विभागाचे माजी आयुक्त ,माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक  ( 1993 नंतर केंद्र आणि राज्य सरकारने व्ही. एन. देशमुख या कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकार्‍यावर मुंबई किनारपट्टी सुरक्षित कशी करता येईल याची पाहणी करण्याची व उपाययोजना सुचविण्याची कामगिरी सोपविली होती )

  3. भीष्मराज बाम, माजी पोलिस महानिरीक्षक,जेष्ठ क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ

  4. संजीव लाटकर, ज्येष्ठ पत्रकार,साम मराठी वाहिनीचे प्रमुख (सुत्र संचालन)


या परिसंवादाचा गोषवारा पुढील प्रमाणेः

  • २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हे एक ट्रेलर होतं, अजून मुख्य सिनेमा बाकी आहे. म्हणजेच याहून मोठा दहशतवादी हल्ला नजिकच्या काळात देशातील महत्वाच्या ठिकाणी होऊ शकतो.

  • मुंबईवरील हल्ला हा कोणा दहशतवादी गटाचा नसून पाकिस्तानी लष्कराचा (Military) होता.

  • हे पाकिस्तानने केलेले एक युध्दच होतं.

  • मुंबईवरील हल्ल्यात पोलिसाना पाकिस्तानी सैनिकांशी थेट लढाई लढावी लागली.

  • पाक गुप्तहेर संघटना (ISI), पाक सेना, वेगवेगळे दहशतवादी गट, पत्रकार, यांचा सहभाग होता.

  • ह्ल्याच्या वेळी पहिल्या दिवशीपासून पाकिस्तानी प्रचार यंत्रणा सुनियोजीत प्रचार करत होती.(चोराच्या उलट्या बोंबा.)

  • कराचीहून निघून कसलाही अडथळा न येता पाक सैनिक ताज आणि इतर ठिकाणी पोहोचले याला आपली ढिसाळ सुरक्षा यंत्रणा हे एक कारण.

  • आपल्या देशातील भ्रष्टाचार हे मुळ कारण.

  • लिट्टे आणि ISI ची हातमिळवणी, केरळ मधून हल्ला करण्याचे मनसूभे.

  • प्रत्येक गोष्ट दुसरा करणार ही वृती.

  • स्वतःचा बचाव आपण स्वतःच करण्याची वेळ आली आहे, आपल्या रक्षणासाठी सरकार आहे हा भ्रम.

  • न्युक्लिअर वेपनस् दहशतवादी गटांच्या हातात असण्याची शक्यता.

  • पाक अणु वैज्ञानिक अब्दुल कादिर खान हे तस्कर आहेत. त्यानी अणुसामूग्रीची तस्करी केली आहे.

  • पाक सरकार हे सैन्याच्या हातातलं बाहुलं

  • २००२ पासून फक्त जम्मु-काश्मिरच नव्हे तर सम्पूर्ण भारतभर हल्ले करण्याचं लक्ष नक्की केलं.

  • अमेरिका फक्त आपलं हित जपण्या एवढाच भारताला पाठींबा देत आहे.

  • स्वतःचा देश सुरक्षीत करून अमेरिकेने सम्पूर्ण जगात दहशतवाद पसरवला.

  • भारत-पाक गुन्हेगार हस्तांतरण व्दिपक्षीय करार होण्या बाबत अमेरिका आग्रही नाही.

  • अमेरिका किंबा युरोपीयन युनिअन कडे धाव घेऊन आपले प्रश्न सुटणार नाही.

  • पाकिस्तानी सरकार आणि लष्कराने मुंबईवर हल्ला केला असताना तो दहशतवादी संघटनेने केल्याचा कांगावा अमेरिका किंबा युरोपीयन युनिअन करीत आहे.

  • दहशतवादयांना जात धर्म नसतो.

  • पाक दहशतवादी गट पुर्ण व्यावसाईक, दहशतवादी गटाच्या म्होरक्याला Company Director सारखी वागणूक, त्यांच्या खर्चावर नियंत्रण नाही.

  • कायद्यातील पळवाटा बंद कराव्या लागतील.

  • ३ डिसेंबर २००८ ला तत्कालीन मुख्यमंत्र्यानी वर्तमान पत्रात जाहिरात देउन जाहिर केलेल्या उपाययोजनावर काडिचेही काम झालेले नाही.

  • मुंबईतल्या जमिनींवर लँडमाफीया , दहशतवाद्यांचं लक्ष आहे.

  • देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, जल मार्गे तसेच जमिन मार्गे घुसखोरी सुरूच. पुर्वेकडील भागात तर बांगलादेशी घुसखोर पोहत येऊन भारतात प्रवेश करतात.

  • पाकिस्तान थेट युध्द करणार नाही.

  • BARC सारख्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो.

  • किरणोत्सर्ग करणारा हल्ला होऊन पिढ्याच्या पिढ्या बरबाद होऊ शकतात.

  • राष्ट्रीय एकात्मता राखून भारतीय लोक १ प्रगती पासून १०० एवढी प्रगती करू शकतात हे पाक विचारवंतांचं मत, पण आपणाला १०० वरून १० पर्यंत खाली खेचण्याची पाकमध्ये ताकत असल्याची गुर्मी.

  • लोकांच्या दबावापुढे केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यानी राजिनामा दिला हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं. हा दबाव कायम ठेवला पाहीजे.

  • घटना घडून गेली म्हणून गाफील राहाता नये.

  • प्रत्यक्ष जीवनमरणाचा प्रश्न आ वासून उभा राहीला आहे.

  • सरकारी नोकरी ही पगारासाठी नसून त्या मूळॆ मिळणार्‍या फायद्यासाठी ( लाच, बक्षिसी) असते असा समज.

  • दहशतवाद्यांना भरतात योग्य शासन होत नाही. ( अफजल गुरूला अजून फाशी दिलेली नाही.)


उपायः

  • भ्रष्टाचार निर्मुलन.

  • राष्ट्रीय चारित्र्याची जपणूक.

  • भारतीय मुल्यांची जपणूक.

  • 'मला काय त्याचे' ही वृत्ती सोडावी लागेल.

  • राजकारण्यांवर अंकुश.

  • चांगल्या लोकांनी राजकारणात येंण जरूरीच.

  • पोलिसदल, सौरक्षणदलांतील राजकीय हस्तक्षेप बंद करणे.

  • घटना घडल्या नंतर तरी त्यातून बोध घेणे.

  • आजुबाजुला घडणार्‍या, खटकणार्‍या गोष्टींची माहिती पोलिसांना देणे.

वरिल परिसंवाद ऎकून सुन्न व्हायला झालं. काहिही होवो ९ वाजले की उठून जाणार्‍या काही पार्लेकरांसहीत सर्व जागेला खिळून होते. परिसंवादात भाग घेतलेले तज्ञ हे जबाबदारीने बोलत होते आणि तसा उल्लेख वारंवार करत होते. तेव्हा मित्र हो, अजुनही वेळ गेलेली नाही 'जागे व्हा' असं सांगत होते. पाक बरोबर युध्द झाल्यास काय परिणाम होतील या बद्दलचा श्री. संदीप वासलेकरांचा लेख http://www.loksatta.com/daily/20081228/sun04.htm या स्थळावर वाचता येईल.

तेव्हा मित्र हो, आपण जागे होणार का ? खरच जागे होउया. परिसंवादातील या गोष्टी आपणास ज्ञात व्हाव्यात, जाणीव निर्माण व्हावी म्हणून या बॉगची लिंक शक्य तेवढ्या लोकांना पाठवा. जागृतीचं काम सर्व मिळून करूया.

नरेंद्र  प्रभू 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates