13 January, 2009

दिपस्तंभ

एकलव्याची गोष्ट आपणा सर्वानाच माहित आहे. अर्जुनापेक्षा सरस म्हणून आपणाला त्याचं कौतुकही आहे, महाभारतातला हा उपेक्षित, किती काळ लोटला त्याला ! पण आज अजुनही त्याच भारतात अनेक प्रकारची आरक्षणं मिळुनही वर्गसंघर्ष आहेच. उपेक्षितातले उपेक्षित, अख्या समाजाने ज्याना परिघाबहेर ठेवलय, त्याना कोण आपलं म्हणणार ? मित्रांनो मी शरिरविक्रय  करणार्‍या महिलांच्या मुलांबद्दल म्हणतोय. प्रत्येक आईला आपलं मुल शिकावं, मोठं व्हावं असं वाटतं या मुलांच्या आयानांही तसं वाटतं, पण कोण शिकवणार त्यांना ? आपल्या महाराष्ट्रात शिक्षणाचे कारखाने खूप आहेत पण ते पैसे कमावण्या साठीचे, आधुनिक शिक्षणसम्राटांचे, श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारे, उपेक्षितांसाठी फक्त अंधार. पण एक दिपस्तंभ उभा आहे.... रेणू गावस्कर.

रेणूताईनी सुखासीन आयुष्याचा त्याग करून वेश्यांच्या मुलांना नवजीवन देण्यासाठी पुण्यात शाळा सुरू केली. ( अधिक माहिती साठी http://www.ekalavyapune.org/default.htm ) मुलांच्या कलाने घेतच त्याना योग्य दिशा दाखवत, आता त्यांच्या शाळेतली मुलं १० वीच्या परिक्षेला बसतील या बद्दल बोलताना मी रेणूताईंना ऎकलं. दोन चिमुरड्या त्यांच्या सोबत होत्या आजीचा हात धरून येतात तशा. डेव्हीड ससून पासून एकलव्य न्यास एक प्रदीर्घ प्रवास. या झंझावाता समोर संकटं टिकली नाहीत. पण जखमा झाल्याच असतीलच ना ? संकटं हिच संधी असं ताई म्हणतात, कसं शक्य झालं ते ? अनेक प्रसंग ज्यांची आपण कल्पनाही करू शकणार नाही, चला खुद्द रेणूताईच्याच तोंडुन ऎकूया..

गुरूवार १५ जानेवारी २००९ संध्याकाळी ६.३०

स्थळः यशवंत नाट्यगृह ,

शिवाजी मंदिर समोरील गल्ली,

दादर - माटुंगा


मुलाखत व सुत्र-संचालन

संपदा जोगळेकर – कुळ्कर्णी


संपर्कः

सुहास ९३२३५९८९०२, आत्माराम ९८९२१८२६५५, विनायक ९२२३२२२८३७, अतुल ९८१९०००२५१


नरेंद्र प्रभू

0 comments:

Post a Comment