मन मानत नाही तरी चार दिवसांपूर्वी माझा प्रिय मित्र चेतन जानी गेला ही गोष्ट खरी आहे. तो निघून गेला पण मागे उरलेल्यांना त्यांचं काम केलच पाहिजे. किंबहूना अधिक जोमाने काम केलं पाहिजे. अंत्यविधीला जाऊन आलो, नातेवाईकांना भेटून आलो. पुढच्या आठवड्यात चाळीस जणांना घेऊन सहलसाठी म्हणून लेह-लडाखच्या टूरवर जायचं म्हणून तयारीला लागलो (म्हणजे कामं आटोपायच्या) तर ती ढगफुटीची बातमी आली. पहिल्यांदा काहीच संपर्क होत नव्हता. नेमकं काय झालयं? कुठे झालय? दुरदर्शन वाहिन्यांवर दाखवतात तेवढं त्याला महत्व द्यायचं काय? (चलचित्र लेहची आणि बाकी भाष्य स्टुडीओमधलं अशी तर्हा असते.) दुरदर्शन आणि आकाशवाणी वरच्या बातम्या ऎकलेल्या बर्या. अशा अवस्थेत कालचा दिवस काढला. आज मात्र लेहला फोन लागले. आमचा मित्र पद्मा सुखरूप आहे. नव्या लेह शहराला त्या ढगफ़ुटीची झळ पोहोचलेली नाही हे समजलं. कारगील-लेह हा राष्ट्रीयमहामार्ग निमू गावाजवळ पूल वाहून गेल्याने बंद आहे हे समजलं. दुसरीकडे लेह-मनाली हा मार्गही बंद आहे. पण हे दोन्ही मार्ग दोन दिवसात सुरू होतील, ब्रोची माणसं कामाला लागली आहेत. लेह मध्ये सामान्य नागरीकांपेक्षा सैनिकच अधिक आहेत, शिवाय सीमावर्ती भागाशी संपर्क तुटलेला ठेवणं देशाला परवडणारं नाही. थोडक्यात परिस्थिती चार दिवसात पुर्ववत होईल. ज्या आमच्या मित्राचा मी वर उल्लेख केला त्या पद्मा च्या घरातही पाणी शिरलं, शेतीवर चिखल चढला. तो स्वतः त्या परिस्थितीतून सावरला आहे आणि आम्ही तिकडे येणार म्हणून वाट बघत आहे. “सब ठिक हो जायेगा आप आ जाओ” असे त्याचे धीराचे शब्द आहेत मी स्वतः ‘Wait and Watch’ पेक्षा ‘Show Must Go On’ वर विश्वास ठेवतो. बारा ऑगस्टची बँच जाणारच.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
.माध्यमे जितक्या जोरात कोकलतात तितकी बातमी फुसकी असते
ReplyDeleteदँट्स स्पिरीट यार, शो मस्ट गो आँन !
ReplyDeleteतुमच्या या धाडशी जिगरला माझा सलाम तसेच तुमच्या आगामी लडाख टुरसाठी मनापासून शुभेच्छा.
येत्या काही दिवसात परिस्थिती व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे... जमल्यास जाताना तिथल्या लोकांसाठी काहीतरी 'उपयोगी वस्तू' घेऊन जाता आल्यातर बघा...
ReplyDeleteफारच भयंकर घटना. आपले मित्र सुखरूप आहेत ना?
ReplyDeleteआत्ताच्या परिस्थितीत तिथे नुसतं पोहोचणच कठीण होऊन बसलय.
ReplyDeleteम्हणूनच माध्यमांची विश्वासार्हता कमी होत चाललीय.
ReplyDeleteविजयजी, जिगरचीच गोष्ट म्हणाल तर ती तुमच्याकडूनच शिकली पाहिजे.
ReplyDeleteभानस, आपणाला वाटणारी काळजी आणि वाटणारी भिती बरोबरच आहे, निसर्गापुढे कुणाचच काही चालत नाही.
ReplyDelete