
चार चौघासारखं व्हावं म्हणून
मरणही साजरं केलं
मरण्याआधीच बापाला
सरणाच्या वाटेने नेलं
जीतेपणीचा दाह
मरणापुर्वीच जाळून गेला
चितेवर मग फक्त
लाकडासह सापळा जळला
अस्थींना नकोच होती
संगमाची एक वारी
पिंडासाठी कोण आता
कावळ्याची आशा धरी ?
कावळ्यांनीसुद्धा आता गाव सोडलं
पिंडाचं महत्व भटजीच्या दक्षिणेपुरतं उरलं
चार चौघासारखं व्हावं म्हणूनच
मरणही साजरं केलं
नरेंद्र प्रभू
agdi khar....
ReplyDeleteयोग, हे अनुभवलं आहे.
ReplyDelete