काळाचौकी तेथे रहाणारा अनिकेष कदम हा तरूण त्या दिवशी धावत्या लोकलमधून धक्कालागून पडला होता आणि त्याला तत्काळ मदत करणारे युवक होते जे.जे. कला महाविद्यालयात शिकणारे सुशांत वायदांडे, कुणाल पाटील, चेतन नेहते, मयूर गुलदगड आणि धवल मंगरूळकर. या सर्व युवकांचं अभिनंदन आणि त्यांच्या संवेदनशीलतेला सलाम ! तसच अशी सकारात्मक बातमी देणार्या लोकसत्ताच्या कैलास कोरडे यांना धन्यवाद.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
खरंच! हल्ली रस्त्यात कोणी पडलं असेल तर कोणीही ढुंकून सुद्धा बघत नाही. जो तो आपल्याच घाईत असतो. पूर्वी जरा काही झालं तर गर्दी गोळा व्हायची व लोक मदत करायला पुढे यायचे. पण हल्ली लोक ’मला काय त्याचे’ असे म्हणून सहज पुढे जातात. या चार मुलांनी त्याला मदत केली ही अजूनही माणुसकी शिल्लक आहे ह्याचेच द्योतक आहे. त्यांनी जर त्याला मदत केली नसती तर तो किती वेळ तसाच पडून राहिला असता. एखादे वेळेस हे जिवावरही बेतू शकते. ही ’मला काय त्याचे’ ही वृत्ती वाढीस लागली आहे. तरीही वरील घटनेवरून सगळेच असे कोरडे नाहीत हे बघून खूप बरे वाटते.
ReplyDelete