26 December, 2009

ग्रंथालीचा वाचकदिन


दादरच्या कीर्ती महाविद्यालयाच्या प्रागंणात काल ग्रंथालीचावाचकदिन..कृतज्ञता दिन साजरा झाला. यावेळी तिथे सरस्वतीच्या उपासकांची झुंबडच उडाली होती. यावर्षीचा हा वाचकदिन विशेष महत्वाचा होता, कारण गंथाली आता पस्तीस वर्षाची झालीय अणि तिचे संस्थापक कार्यक्रमाचे उत्सवमुर्ती दिनकर गांगल सत्तर वर्षाचे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते दिनकर गांगल यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी बोलताना डॉ. बंग म्हणाले की नावात ‘ग’ असूनही गांगलाना ग ची बाधा कधीच झाली नाही. चॅनल आणि मॉलच्या व्यसनात नवी पिढी अडकली असल्यानी आता पुर्वीसारख्या चळवळी होताना दिसत नाहीत. पण परिवर्तन होतच आहे. उच्चवर्णीय आणि दलित यांच्यातील दरी कमी करण्याचं मोलाच काम जे महाराष्ट्राच्या बाबतीत गांधीजीनाही जमलं नाहे ते ग्रंथालीने करून दाखवलं. ग्रंथालीच्या या कार्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात तोड नाही या शब्दात त्यानी ग्रंथालीचा गौरव केला.

प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले सारस्वत बॅकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी या वेळी मराठी साहित्य विश्वाला मोठी भेट जाहीर केली. दुर्मिळ ग्रंथांची पुनर्निमिती आणि उत्तमोत्तम ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी बँकेतर्फे ५० कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १ टक्का व्याजाने दिले जाणार आहे. येत्या १० वर्षात ही रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डॉ. विजया राजाध्यक्ष, दिनकर गांगल, अरुण साधू आदी साहित्यिकांची समितीही स्थापन करण्यात येईल असही त्यानी जाहीर केलं.

केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अंधाराकडून उजेडाकडी नेणारी ही गंथालीची चळवळ आही आणि गंथालीने आजवर ४५० ग्रंथ प्रकाशीत केले याचा त्यानी गौरवपुर्ण उल्लेख केला. एकच तुतारी नाही तर अशा अनेक तुतार्‍या निर्माण करून तळागाळातल्या समाजाच्या आवाजाला वाट मोकळी करून दिली. गांगल संचालक पदावरून निवृत्त होत असले तरी त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना गप्प बसू देणार नाही असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आणि नवीन संचालक मंडळ तेवढ्याच जबाबदारीने काम करेल अशी खात्री असल्याचं नमूद केलं.

उपराकार लक्ष्मण माने, विजया राजाध्यक्ष, अच्यूत गोडबोले, कवी शंकर वैद्य, अरूण राधू, कुमार केतकर, डॉ. प्रेमानंद रामाणी, रामदास फुटाणे असे नामवंत, किर्तिवंत लेखक, कवी हजर होते. दिनकर गांगल यांच्या पत्नी अनुराधा गांगल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. ग्रंथालीला ३५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रकाश चव्हाण यांचे उदई’, सुधीर व नंदिनी थत्ते यांचे नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’, भगवान इंगळे यांचे भिडूही पुस्तके व गोविंद काजरेकर यांचे उरल्या सुरल्या जगण्याचं रिमिक्स’, अंजली कुलकर्णी यांचे बदलत गेलेली सही’, शंकरराव दिघे यांचे या शतकाचा सात-बाराच होईल कोराया कवितासंग्रहाचे प्रकाशन कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य केंकरे व उषा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.


2 comments:

  1. I didn't find that zeal and enthusiastic crowd when I attended this Vaachak Din function which is used to be before three decades. Granthali has been a movement under the able leadership of Shri Gangal. More and more young ones are needed to carry on his noble aims. Time has changed, so Granthali! I thought this function to be a full day programme with some theme, but it was shortened beyond my expectations. Granthali movement has a long way to go!
    Mangesh Nabar

    ReplyDelete
  2. मंगेशदा, आता ग्रंथालीची चळवळ चांगलीच फोफावली आहे. श्री. दिनकर गांगलांचे अथक प्रयत्न त्या मागे आहेत हे नक्की.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates