26 September, 2009

त्यांना फक्त प्रसादाशी मतलब



निवडणूकीचा खेळ सुरू झाला आहे. निवडणूका जाहीर झाल्यापासून शह-काटशह देण्याचं राजकारण सगळेच राजकारणी खेळत आहेत. गेली पाच वर्ष केवळ आपलीच पोट भरण्यात मग्न आसलेले हे पुढारी आता जनतेची काळजी करण्याचं नाटक तरी करतील असं वाटत होतं. पण ‘कसलं काय आणि दहा पक्षात पाय’ अशी यांची अवस्था आहे. एकदा निवडून आलो म्हणजे तो मतदार संघ आपली जहागीर समजणारे काहीजण तर पक्षनिष्ठा, तत्व वैगेरे बाजूला ठेवून तिकीट देईल त्या कळपात सामील होत आहेत. कसलीच बांधिलकी न मानणारे असे लोक मतदारांशी प्रामाणीक राहूच शकत नाहीत. पुजेच्या मंडपाबाहेर प्रसादाच्या आशेने उभ्या असलेल्या भिकार्‍यांसारखी यांची गत आहे. देव आणि पुजा करणारे या दोघांशी त्यांना काहीच देणंघेणं नसतं, फक्त प्रसादाशी मतलब. नाहीतर, एका रात्रीत निष्ठा बदलणारे कालपर्यंत ज्याला विष्ठा म्हणत होते त्याच पंगतीत कसे बसतात ?


पण जनता म्हणजे काय यांच्या गोठ्यातली गाय आहे ? यांनी कशाचीही सरमिसळ करावी आणि जनतेने ते मान्य करावं. दलबदलू मग तो कोणत्याही पक्षाचा असूदे त्याला घरचा रस्ता दाखवणं हे आता जनतेचं काम आहे


नरेन्द्र प्रभू

3 comments:

  1. मला हे समजत नाही की तुम्ही पक्षनिष्ठेला इतकं महत्व कां देता? त्या ऐवजी एखाद्या चांगल्या उमेदवाराला मत द्या. पक्षाची आयडिओलॉजी ही फक्त निवडणुकी पुरती असते . एकदा निवडणुक झाली की ती सरळ टांगुन ठेततात. उमेदवार चांगला असेल तर मग तो अगदी कुठल्याही पक्षाचा असो.. त्याला निवडुन दिलं तर असे प्रश्न उद्भवणार नाह असे वाटते.

    ReplyDelete
  2. महेंद्रजी, एकाच घ्रातून तीन तीन लोक आमदार, खासदार, मंत्री पदं लाटत आहेत, कोकणातला एक दादा तर मी नाही तर कुणीच नाही अशी भुमिका घेउउन वावरत आहे. या उडदातून काळे गोरे कसे निवडायचे ?

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates