27 September, 2009

जीवनाचा कंटाळा आलाय


‘जीवनाचा कंटाळा आलाय’, ‘मला जगावसच वाटत नाही’ हे बोल कुणा दुर्धर आजार झालेल्या, मनोभंग झालेल्या किंवा परिक्षेत नापास झालेल्या व्यक्तीचे नसून माझ्याच मुलीच्या एका मैत्रिणीचे आहेत. क्षमा असं सांगत होती, म्हणून मला जेव्हा माझ्या मुलीने सांगितलं तेव्हा मी सुन्न झालो. सहावीत शिकणारी ही कोवळी पोर, हे तिचं खेळण्या-बागडण्याचं वय. नुकतीच उमलू लागलेली ही कळी हिच्या मनात असे आत्मघातकी विचार का यावेत ? चांगल्या सुशिक्षीत, सधन कुटूंबात, सुरक्षित वातावरणात वाढत असताना ‘मला हे आयुष्य नको आहे, मला नाही जगायच’ असं का म्हणतेय ?

या प्रश्नाचं उत्तर दडलय़ ते अभ्यासात. अतिशय हुशार असलेली क्षमा चौथीला स्कॉलरशीप मिळवलेली. हिन्दी सुबोध, होमी भाभा बाल वैज्ञानीक परीक्षा, पुढच्या वर्षीचा सातवीच्या स्कॉलरशीपचा अभ्यास, एवढी ओझी संभाळत चांगला अभ्यास करतेय. पण तिच्या आईने कमाल केली ती तिला सहावीची सगळी पुस्तकं तोंडपाठ करायच फर्मान काढून. हो ‘तोंडपाठ’, अगदी भुगोलाचे रुक्ष धडेही तोडपाठ हवेत म्हणून बिचारी क्षमा शाळेत मोकळ्या वेळातही ते पाठ करत बसलेली असते. हे असे पालक असतील तर कुणाला जगावसं वाटेल ? काय करावं त्या मुलांनी ? स्पर्धेला तोंड द्यायचं म्हणून त्या मुलांची मनं मारून, त्यांची अभ्यासातली गोडीच नष्ट करून हे पालक काय साध्य करणार आहेत ? अस करून ही मुलं पुढे जीवनात यशस्वी होतील का ? ते जाऊदे, पालकांचं नियंत्रण संपल्यावर कोणत्या थराला जातील ? आणि समजा तिने खरच जिवाचं काही बरं-वाईट केलं तर ?

अभ्यासात गोडी निर्माण झाली पाहीजे. जगण्याची उर्मी, आनंद वढवण्यासाठी अभ्यास असतो हे कघी कळणार आपल्याला ? परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे.

नरेन्द्र प्रभू


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates