23 October, 2009

मनसेने मुलूंड टोल नाका फ्रि केला.......!


आज मुलूंड ठाणे दरम्यान चालत्या लोकल ट्रेनवर पाण्याची जलवाहिनी कोसळून अपघात झाला. दोघेजण ठार तर काही जखमी झाले, अर्धी मुंबई विस्कळीत झाली. पुर्व द्रुतगती मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली. रोज लोकलने प्रवास करणारे लाखो चाकरमानी मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आपण ज्याना बिच्चारे म्हणतो ते टॅक्सी-रिक्षा ड्रायव्हर दाम दुप्पटीने पैसे वसूल करतात. त्यात टोल भरून प्रवास करावा लागतो. अशा वेळी प्रशासनाने हस्तक्षेप करून लोकांची सोय बघितली पाहीजे. प्रशासन जेव्हा हातावर हात घेवून बसतं तेव्हा खुप गैरसोय होते. आज मुलूंड टोल नाक्यावर मसैनिकांनी जावून टोल नाका फ़्रि केला ते उत्तम झालं. नाहीतरी हे टोलवाले मला वल्याकोळीच वाटतात.

1 comment:

  1. मनसे राज आल्यावर महाराष्ट्र अजून सुधारेल.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates