आज मुलूंड ठाणे दरम्यान चालत्या लोकल ट्रेनवर पाण्याची जलवाहिनी कोसळून अपघात झाला. दोघेजण ठार तर काही जखमी झाले, अर्धी मुंबई विस्कळीत झाली. पुर्व द्रुतगती मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली. रोज लोकलने प्रवास करणारे लाखो चाकरमानी मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आपण ज्याना बिच्चारे म्हणतो ते टॅक्सी-रिक्षा ड्रायव्हर दाम दुप्पटीने पैसे वसूल करतात. त्यात टोल भरून प्रवास करावा लागतो. अशा वेळी प्रशासनाने हस्तक्षेप करून लोकांची सोय बघितली पाहीजे. प्रशासन जेव्हा हातावर हात घेवून बसतं तेव्हा खुप गैरसोय होते. आज मुलूंड टोल नाक्यावर मसैनिकांनी जावून टोल नाका फ़्रि केला ते उत्तम झालं. नाहीतरी हे टोलवाले मला वल्याकोळीच वाटतात.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
मनसे राज आल्यावर महाराष्ट्र अजून सुधारेल.
ReplyDelete